स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. सशस्त्र क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान ठरले. देशाच्या राजकारणात मार्गदर्शक ठरले. पूर्वापार चालत आलेल्या रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, अस्पृश्यता यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. आधुनिकीकरण, वैज्ञानिक दृष्टीकोन, सैनिकीकरणाचा पुरस्कार केला. आजही पचवायला कठीण वाटणाऱ्या विचारांचं संचित त्यांनी आपल्याला दिलं. समाज प्रबोधनासाठी नाटकं लिहिली, लावण्या लिहिल्या, पोवाडे-फटके लिहिले. या साऱ्याची सुरुवात झाली ती अगदी लहानपणीच.

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ ला नाशिक जवळच्या भगूर येथे झाला. वडील दामोदरपंत आणि आई राधाबाई. वीर विनायकाचे जेष्ठ बंधू गणेश दामोदर अर्थात बाबाराव सावरकर, बहीण मैनाबाई, धाकटे बंधू नारायण दामोदर अर्थात बाळ सावरकर. आई राधाबाई लवकर वारल्यामुळे दामोदरपंतांनीच आपल्या मुलांचा सांभाळ केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्मारक उद्दिष्टे :

  • वीर सावरकरांची विचारधारा आणि शिकवण यांचा अभ्यास करणे.
  • अग्रणी क्रांतिकारक, निर्भीड स्वातंत्र्यसैनिक, सर्जनशील समाजसुधारक, एक महान देशभक्त, लेखक आणि कवी अशा इतर सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये मार्गदर्शक या दृष्टीकोनातूनवेगवेगळ्या विचारधारा आणि शिकवणींचा तर्कसंगत अभ्यास करणे.
  • विविध व्यक्तिमत्त्वांच्या आणि लेखकांच्या विचारसरणींचा तौलनिक अभ्यास करणे आणि वीर सावरकरांसह त्यांच्या कृतींचे भाषांतर आणि प्रकाशन करणे.
  • वीर सावरकरांसह सर्व वीर व्यक्तिमत्वांच्या जीवनावर आणि कार्यांवर संशोधन करणे आणि त्यांची प्रमाणित चरित्रे प्रकाशित करणे.
  • मातृभूमी आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी जे लढले आणि हौतात्म्य पत्करले त्यांना आदरांजली वाहणे. संशोधन कार्य अभ्यासण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी स्मारक आणि संग्रहालय उभारणे, तसेच पुनर्लेखन करण्याच्या दृष्टीकोनातून स्त्रोत सामग्री गोळा करणे आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा खरा इतिहास प्रकाशित करणे.
  • स्वयंसेवकांना प्रशिक्षित करणे आणि नियुक्त करणे आणि भारतीय संस्कृतीचे शिक्षण देण्यासाठी कार्य करणे.
  • समाजातील असमानता दूर करण्यावर विशेष भर देऊन देशात सामाजिक सुधारणांचे उपक्रम सुरू करणे.
  • भारतीय संस्कृती आणि लोकगीते यावर आधारित कला, नृत्य, नाटक यांच्या अभ्यास आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना चालना देणे आणि त्यांचा तुलनात्मक अभ्यास वाढवणे आणि त्यासाठी केंद्र तयार करणे.
  • सैनिकीकरण आणि वैज्ञानिक प्रगतीच्या भावनेला प्रोत्साहन देणे आणि लष्करी शाळा, रायफल क्लब आणि शारीरिक प्रशिक्षणासाठी संस्था सुरू करणे. राष्ट्र मजबूत आणि प्रगतीशील बनवण्यासाठी देशामध्ये राष्ट्रभावना विकसित करण्याच्या उद्देशाने इतर उपक्रम सुरु करणे.
  • लिपी आणि भाषांच्या सुधारणांबाबत वीर सावरकरांचे विचार प्रगत करणे आणि राष्ट्राच्या विकासात आणि प्रगतीत प्रभावी साधने बनवण्याच्या दृष्टीने प्राचीन आणि आधुनिक भारतीय भाषा आणि त्यांच्या लिपींचा अभ्यास आणि संशोधन आयोजित करणे.

उपक्रम

नेमबाजी

  • भारतातील सर्व प्रथम अत्याधुनिक सुखसुविधा असलेली रायफल रेंज (बिगर सरकारी)
  • सरावासाठी SUIS ASCOR प्रणाली उपलब्ध.

धनुर्विद्या

  • मुंबईतील प्रथम आणि नामांकित आर्चरी प्रशिक्षण संस्था
  • इंडोअर १० मीटर तसेच २५ मीटर रेंज 
  • प्रशिक्षणासाठी उच्च दर्जाचे साहित्य

मुष्टियुद्ध

  • १९ x १९ बॉक्सिंग रिंग असलेला पहिला क्लब (२०११ पासून)
  • शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी
  • प्रशिक्षणाकरीता उच्च दर्जाच्या उपकरणांनी सुसज्ज

तायक्वांडो

  • तायक्वांदोचे क्रीडा उपप्रकार – बौने स्पॅरिंग आणि फुम्से (पवित्र स्वरूप).
  • विश्वचषक आणि ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.